पानं होते उतावळे
लेखणीला होती घाई
कवितेत बोलनार होती
आज "माझी आई"
लाहानपनीच बरं होतं
तुझ्या कुशीत घर होतं
मला काहीच कळत नसलं
तरी माझचं सगळं खरं होतं
मी कहीही म्हंटल तरी
तू हो म्हणायची
माझा प्रत्येक हट्ट तू
हसत हसत पुर्ण करायचीस
थोड मोठ झाल्यावर
शाळेत मला घातलं होत
खुप सारय़ा गोष्टींच
पाठांतर तुच घेतलं होतस
कितीही गुण मिळाले
तरी कौतूक तुच करायचीस
माझ्या निकालाच्या दिवशी माझा
आवडीचा पदार्थ करायचीस
मी पहीले पा सूनच
खोड्या खुप करायचो
बाबा घरी आले की
खुप ओरडा खायचो
पण तू मात्र नेहमीच माझी
बाजू घेवून भांडायचीस
रडताना मग माझ्या हातात
लाडू किंवा वडी द्यायचीस
म्हणूनच,
लाहानपणीच बरं होतं
तुझ्या कुशीत घर होतं
मला काहीच कळत नसलं
तरी माझचं सगळं खरं होतं
काँलेजसाठी मग मला
बाहेरगावी पाठवलस
माझ्यासाठीच तू मला
तुझ्यापासून दुर केलस
आता माझ्यासाठी
सगळ काही नवीन होत
तुझ्या आठवणी शिवाय
माझ अस काहीच नव्हतं
तरीसूध्दा थंन्डीमधे तुझ्याच
उबेची शाल होती
अन अडचनीला तुझ्या,
शिकवणीची ढाल होती
आता मात्र तू थोडी
पुर्वीपेक्षा कठोर होती
तरीसुध्दा संकट झेलायला
नेहमीच माझ्या समोर होती
आधी तू न्यायाधीश होतीस
निर्णय मला द्यायचीस
आता तू वकील होतीस
माझा निर्णय सार्थ ठरवायचीस
आज मी मोठा आहे
बदललोय खुप
तू मात्र तशीच आहेस
जणू ई्श्वराच रूप
अजूनही माझा उत्कर्ष
हेच तुझ ध्येय आहे
अन तुझ्यासाठी तूझा मुलगा
नेहमीच अजेय्य आहे
आज बाहेरच्या जगात माझे
कित्येक पराभव होतात
माझी छोठी मोठी दुःखे सुध्दा
तुझ्या जिव्हारी लागून राहतात
आता थकलीस शरीरानी
अनं मनानीही जराशी
तरीही माझीच चिंता
नेहमीच तुझ्या उराशी
तुला वाटत थकलीस हे
मला अजीबात कळत नाही
पण तुझ्याशिवाय मला
हक्काच दुसर कुणीच नाही
आभार वगॆरे मानून मी
ॠणमूक्त होत नाही
तुझ्या ॠणातच राहून
तुझे ॠण फेडणार "आई"
No comments:
Post a Comment