एकदा एक वाघूळ, काटेरी झाड आणि समुद्रपक्षी यांनी भागीदारीने व्यापार करण्याचे ठरविले. व्यापारासाठी वाघुळाने भांडवल घातले. काटेझाडाने कापड आणले आणि समुद्रपक्ष्याने पितळ आणली सगळा माल जहाजात घालून ते व्यापारास निघाले. परंतु, वाटेत प्रचंड वादळ होऊन जहाज समुद्रात बुडाले. ते तिघे म्हणून येणाच्या-जाणाच्यांचे कपडे फाडू लागले व समुद्रपक्षी समुद्रात सारख्या उडया मारून आपली पितळ शोधू लागला.
तात्पर्य - एखाद्याचे मोठे नुकसान झाले असता तो ते सहसा कधी विसरत नाही.